॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे आपल्याजवळ असतात, तेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी, त्याच्या वेदना जाणवत नाहीत. शुभ सकाळ!

1 year ago
approved

मनाला जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते. न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषा काही वेगळीच असते. शुभ सकाळ

1 year ago
approved

आयुष्यात काही आठवणी विसरता येत नाहीत आणि काही तोडता येत नाहीत. जीवनात माणसं दुरावली तरी मन नाही दुरावत चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत… सकाळच्या सुंदर शुभेच्छा

1 year ago
approved

नारळ आणि माणूस दर्शनी कितीही चांगले असले तरीही नारळ फोडल्या शिवाय आणि माणूस जोडल्याशिवाय कळत नाही. शुभ सकाळ

1 year ago
approved

छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही. अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते, कारण छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात पण अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वत: असतो.

1 year ago
approved

सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात ती फक्त पहायची असतात… कधी कधी त्यात रंग भरायचे असतात पण स्वप्न पुर्ण झालं नाही तर दुखी व्हायच नसतं.. रंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं फक्त लक्षात ठेवायच असतं सर्वच काही आपल नसत. शुभ सकाळ!

1 year ago
approved

जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका.. कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…! शुभ सकाळ!

1 year ago
approved

या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात पण चालणारे आपण एकटेच असतो, पडल्यावर हसणारे अनेकजण असतात, पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात. शुभ सकाळ!

1 year ago
approved

माझ्यामागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही, माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.

1 year ago
approved

आपुलकी असेल तर जीवन सुंदर फुले असतील तर बाग सुंदर गालातल्या गालात एक छोटस हसु असेल तर चेहरा सुंदर आणि नाती मनापासून जपली तरच आठवणी सुंदर शुभ सकाळ

1 year ago
approved
🟢 Online (4) 🟢