॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

हसता-खेळता घालवुया दिवसाचा प्रत्येक क्षण भगवंताच्या नामस्मरणाने ठेवुया प्रसन्न मन आनंदाने फुलवुया जीवनाचा सुंदर मळा सद्विचारांच्या रंगाने रंगवुया मनाचा फळा सुर्योदयाच्या साक्षीने देऊ सर्वांना शुभेच्छा सुख-समाधान-शांती लाभो हीच ईश्वर चरणी इच्छा.

1 year ago
approved

हसतच कुणीतरी भेटत असतं, नकळत आपल्यापेक्षाही आपलसं वाटत असतं, केव्हा कोण जाणे मनात घर करुन राहत असतं, ते जोपर्यंत जवळ आहे त्याला फूलासारखं जपायचं असतं, दूर गेल्यावरही आठवण म्हणून मनात साठवायचं असतं, याचचं तर नाव “मैत्री”असं असत. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.

1 year ago
approved

तोंडी साखरेचा, गोडवा कायम असावा​ ​मनात कुणाच्या, कधी राग नसावा आयुष्यात जोडावी माणसे, जपावी नाते​ विसरून जावे व्यवहारी, फायदे तोटे सुख क्षणांचे मणी, हळुवार प्रेमाने ओवावे​,​ आनंदी सुरांनी, मनास छेडावे. शुभ सकाळ

1 year ago
approved

आयुष्यात निर्मळ मनाने बनवलेली नाती कधीच धोका देत नाही म्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करा रहा नाती कधीच तुटत नाही. शुभ सकाळ

1 year ago
approved

माणुस स्वत: च्या नजरेत चांगला पाहीजे लोकांच काय ,लोक तर देवात पण चुका काढतात. सुप्रभात

1 year ago
approved

मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही कवितेला चाल नाही जोपर्यंत तुम्ही ती गात नाही त्याच प्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही जो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही मन वळु नये,अशी श्रध्दा हवी निष्ठा ढळू नये,अशी भक्ती हवी सामर्थ्य संपू नये,अशी शक्ती हवी कधी विसरु नये,अशी नाती हवी शुभ सकाळ

1 year ago
approved

देवाकडे काही मागायचे असेल तर नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा, तुम्हाला कधी स्वत:साठी काही मागायची गरज पडणार नाही.

1 year ago
approved

क्षमा म्हणजे काय” ?? सुंदर उत्तर……- चुरगळल्यानंतरही फुलांच्या पाकळयांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा….! शुभ सकाळ

1 year ago
approved

लाखात एक सत्य 84 लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो, पण कुठलाचं जीव उपाशी रहात नाही. आणि माणूस पैसे कमवून सुद्धा त्याचे कधीच पोट भरत नाही..? शुभ सकाळ

1 year ago
approved

जिथे दान देण्याची सवय असते, तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते, तिथे माणसांची कमी नसते. डोक शांत असलं की सहसा निर्णय चुकत नाहीत, व भाषा गोड असली की माणसं तुटत नाहीत.

1 year ago
approved
🟢 Online (4) 🟢